14 वा वित्त आयोग आणि 15 वा वित्त आयोग निधी खर्च करायचा बाबद
14 वा वित्त आयोग:-
या मध्ये केंद्र सरकार कडून प्रती व्यक्ती 488 रुपये इतका मिळतो.
गावाची लोकसंख्या × 488 = 14 वित्त आयोग.
उदा. 800 लोक × 488 = 390,400 रू.
5 वर्षा करिता 1,952,000 रू.
हा निधी 48% आणि 52% 5 वर्षा करिता आराखड्यानुसार खर्च करायचा आहे. या मध्ये आरोग्य योजना, बाल कल्याण योजना, उप जिविका योजना, मागास वर्गीय योजना, अपंग कल्याण योजना या करिता 48% निधी खर्च करने कायद्याने बंधन कारक आहे.
उरलेला 52% निधी गावाचा विकासाकरिता सिमेंट/काँक्रिट चे रस्ते, ग्रामपंचायत ला रंग रंगरंगोटी करणे, ग्रामपंचायत चे सौचालय दुरुस्ती करणे योग्य ठिकाणी पिण्याचा पाण्याची सोय करणे, सांड पाण्याचा निचरा तयार करण्यासाठी सौच खड्डे तयार करणे असे अनेक काम आराखड्याप्रमाणे खर्च करणे कायद्याने बंधन कारक आहे.
15 वा वित्त आयोग :-
15 वा वित्त आयोग सदर निधी हा बंधीत व अबंधित प्रमाणे खर्च करायचा असतो 50% बंधित आणि 50% अबंधित साठी आराखड्या प्रमाणे खर्च करायचा आहे. 15 वा वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यापूर्वी 14 वा वित्त आयोगाचा जमा खर्च शासनाने सांगितल्या प्रमाणे तक्त्यात सादर करणे बंधन कारक आहे, सरपंच व ग्रामसेवक यांची डिजिटल सॉक्षरी काढणे(DSC) बंधन कारक आहे. ई- ग्राम स्वराज्य प्रीया सॉफ्ट चालू तारखे पर्यंत बंद करण्यात यावे. PFMS ला ग्रामसेवक व सरपंच यांची डिजिटल सॉक्षरी रजिस्टर करणे बंधन कारक आहे. तसेच ग्रामपंचायत चे GEM पोर्टल चे रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. वरील गोष्टी ची पुर्तता केल्यावरच आपल्याला 15 वा वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यास परवानगी मिळते.
15 वां वित्त आयोगाचा निधी गावातील प्रत्येक व्यक्ती करिता दर वर्षी सरासरी 957 रुपये इतका मिळतो.
उदा. 800 लोक × 957 = 7,65,000 रू.
5 वर्ष × 7,65,000 रू.
3,828,000 रु. इतका


0 टिप्पण्या